E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राज्यसभेच्या आठ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक
Samruddhi Dhayagude
27 May 2025
नवी दिल्ली : राज्यसभेच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत आहे. या जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक घेण्यात येईल, अशी घोषणा निवडणूक आयोगाने सोमवारी केली.यामध्ये आसाममधील दोन आणि तामिळनाडूतील सहा जागांचा समावेश आहे. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी होईल, असेही त्यांनी सांगितले.
आसाममधील बिरेंद्र प्रसाद बैस्य (भाजप) आणि मिशन रंजन दास (भाजप) यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपत आहे. त्याचप्रमाणे, तामिळनाडूतील अंबुमणी रामदास (पट्टाली मक्कल काची), एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके), एम. षणमुगम (डीएमके), पी विल्सन (द्रमुक) आणि वायको (एमडीएमके) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या निवडणुकीची अधिसूचना २ जून रोजी काढली जाईल, असेही आयोगाने सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका घ्या
नॅशनल कॉन्फरन्सची मागणी
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका घेण्याची विनंती नॅशनल कॉन्फरन्सने सोमवारी मुख्य निवडणूक आयोगाला केली. विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, हेही निदर्शनास आणून दिले.निवडणूक आयोगाने चार राज्यांमधील विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. परंतु, त्यात बडगाम आणि नागरोटा विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही, असेही सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने निदर्शनास आणून दिले आहे.
जम्मू आणि काश्मीरला राज्यसभेत प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे. त्यामुळेच, जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती आपण केली असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्य प्रवक्ते तन्वीर सादिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले.जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, राज्यसभेच्या जागा अजूनही रिकाम्या आहेत, असेही ते म्हणाले.
बडगाम आणि नागरोटा वगळता सर्वत्र पोटनिवडणुका होत आहेत. फक्त जम्मू आणि काश्मीरमध्येच विलंब का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.विधानसभा निवडणुकीत उमर अब्दुल्ला यांनी गंदरबल आणि बडगाम मतदारसंघातून विजय नोंदविला होता. त्यानंतर, गंदरबलची जागा राखताना बडगामची जागा सोडली होती. त्यामुळे, ही जागा रिकामी आहे. तर, भाजप नेते आणि विद्यमान आमदार देवेंदर राणा यांच्या निधनामुळे नगरोटाची जागा रिकामी झाली होती.
Related
Articles
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात